मंगलवार, 24 मई 2022

संत चरित्रकार महिपती ताहराबादकर

संतचरित्रकार संत कवि महीपति  तहराबादकर

ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते. ताहराबाद ही त्यांची सासुरवाडी.


  दामाजी पंतांच्या मंगळवेढयाहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी ताहराबाद येथे स्थायीक झाले. 

महिपती यांचे शिक्षण तांभेरे येथील श्री मोरोबा तांभेरकर यांच्या कडे झाले. संस्कृत भाषेचे ज्ञान जुजबी परंतु मराठी भाषेत अवीट गोडी व काव्यप्रतिभा जन्मजात होती.

वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोशी पद सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. एकदा दारी मुस्लिम सरदार आला तेव्हा महाराज विठ्ठल पुजेत मग्न होते.त्यांना आदेश झाला की दफ्तर घेऊन त्वरित हजर व्हावे.महिपती महाराज नाराज झाले,त्यांनी त्या क्षणी कुलकर्णी पद सोडले व आपली लेखनी आयुष्यभर संत चरित्रे लिखाण व विठ्ठल भक्तीत वाहुन घेतले. त्यांनी आपल्या कुळात कोणी ही परकीय गुलामगिरी करणार नाही असे घोषित केले. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.

पुत्र विठ्ठल बुवा पेशवे दरबारी गायक होते व दूसरे पुत्र नारायण  कवि मोरोपंत यांचे मित्र होते.

महाराज उत्तर भारतात अनेक क्षेत्रांत तीर्थयात्रा केली होती.ग्वाल्हेर येथे नाभाजी कृत भक्तमाल ग्रंथाचा विशेष प्रभाव होता. भक्तमाल ग्रंथात उत्तर भारतातील अनेक संतांचा परिचय ग्वाल्हेरी भाषेत दिलेला आहे. त्यांनी पुढे भक्तविजय , भक्तलीलामृत व संतविजय ग्रंथा द्वारे अनेक संतांचा परिचय महाराष्ट्राला रसाळ मराठी भाषेत प्रदान केला. त्यांच्या भक्तविजय ग्रंथाचा इंग्रजी भाषेत अनुवाद करताना जस्टीन अब्बोट यांनी निरीक्षण 'स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स' या जगप्रसिद्ध पुस्तकात केला आहे.महिपती यांची भाषा सरळ सोपी जन सामान्यांना भावेल अशी होती. त्यांच्या रचनेत भक्ती,प्रेम,ज्ञान यांचा संगम होता. त्यामुळे अनेक परकीय लेखकांना अनुवाद करणे सोपे झाले होते. महिपती यांनी मराठी भाषेत केलेले काम अत्यंत श्रेष्ठ आहे,कदाचित ते जागतिक पातळीवर अभिजात लेखक गणले गेले असते.


महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.


समाजात संतांचे कार्य निश्चितच फार मोलाचे आहे. ईश्वर भक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश, ओवी, अभंगाद्वारे त्यानी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात संत परंपरेचा अभ्यस करताना संत महिपती महाराज रचित 'भक्ती विजय' व 'संतलीला मृत' या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. मराठी भाषेतील रसाळ व काव्यमय चरीत्राची निर्मिती करणारा थोर संत महिपती महाराज यांचा जन्म 1715 रोजी राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे झाला. मुगल काळातील गावाचे कुलकर्णी पद सांभाळताना महाराजांनी दरवर्षी पायी पंढरपुर यात्रा चुकवली नाही. संतांचा संग, तुकारामांचा आशीर्वाद व प्राकृत मराठी भाषेची गोडी या संगमातुन महाराजांनी महाराष्ट्रा बाहेरील 116 व महाराष्ट्रातील 168 संतांची चरित्रे लिहुन प्राचीन मराठीचे भांडार समृद्ध केले आहे.

"संतांची चरित्रे संपूर्ण! एकदाची ना कळती जाण!! 

तेव्हा जी झाली आठवण! ती चरित्रे लिहून ठेविली!!" 

या ओवीतूनच महाराजांची संत चरित्र शब्द बध्द करण्यामागची भुमिका स्पष्ट होते. तुकाराम महाराजांच्या समकालीन महिपती बुवांना तुकाराम यानांच गुरू मानले होते. संस्कृत भाषेतील बंदिस्त ईश्वर भक्ती सर्व सामान्यांच्या बोली भाषेत गंगेच्या रुपाने आणण्याचे पवित्र कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. त्यांचेच कार्य पुढे तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या बरोबरीने महिपती बुवांनी चालविले. अठराव्या शतकात ग्रामीण भागातील जनतेत ईश्वर भक्ती जागृत करण्याकरीता संत चरित्र व्याख्यान व काव्य रुपाने साध्या सोप्या रसाळ मराठी भाषेत रचले गेले. संत कथा व्याख्यानात महाराष्ट्र रंगू लागला. दामाजी पंतांच्या मंगळवेढयाहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी ताहराबाद येथे स्थायीक झाले. दादोबाच्या याच मुलाने दुष्काळात आपले घर दामाजी पंता प्रमाणे गोर गरीबांकडून लुटवून घेतले. अल्प मिळकतीत आपल्याकडे जे आहे ते गरजुसांठी दान करणे या मागे समाजहिताची फार मोठी व्यापक दृष्टी लागते. संतांची वैशिष्टये हेच सांगतात की 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' 

हाच उपक्रम त्यानी पुढील तीन दुष्काळात आरंभिला. वारकरी संप्रदायातील नम्र भाषा प्रभु उदारवादी व पांडुरंग भक्त महिपती महाराज पेशवाईत लोकप्रिय न झाले असते तरच नवल होते.श्रीमंत बाजीराव पेशवे व त्या नंतर मल्हारराव होळकर यांनी महिपती महाराज यांच्या वंशाकरीता जमीन व मान पत्र केल्याची नोंद आहे.

संतसाहित्याचे अभ्यासक श्री.रा.चि.ढेरे म्हणतात "महिपती महाराजांच्या ग्रंथांनी सतत दीडशे दोनशे वर्षे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकमानस सात्विक संस्कारांनी भारुन टाकले होते. काल परवा पर्यत ग्रंथांचीच प्रतिष्ठा सार्वत्रिक होती. हा प्रभाव दुर्लक्षण्याजोगा नाही. संत प्रितीतुन प्रकट झाले आहे. या महान कार्यासाठी महाराष्ट्राने महिपतीचे ऋण प्राजळपणे मान्य करावयास हवे."




दरवर्षी पंढरपुर आळंदी यात्रा करुन महाराजांनी संपूर्ण भारत यात्रा केली होती. उत्तर भारतातील मीरा, कबीर, सुरदास, नरसी मेहता यांच्या बरोबर नामदेव, तुकाराम, रामदास या महाराष्ट्रातील संतांचे चरित्र मोठया मेहनतीने एकत्र करुन मराठीत आणले आहे त्यांच्या या प्राचीन साहित्याचा अभ्यास श्री.वि.वा.राजवाडे, श्री.रा.चि.ढेरे, श्री.भा.ग.सुर्वे, श्री.प्र.रा.भांडारकर, श्री.वि.ल.भावे, सौ.उषाताई देशमुख, श्री.सुरेश जोशी या मान्यवरांनी केला आहे.

संत महिपती महाराज रचित भक्तविजय ग्रंथाचा अनुवाद इंग्रजी भाषेत Saints of Maharashtra, Saints of Pndharapur नावाने जगात प्रसिद्ध पावला आहे. भक्तविजय ग्रंथ दक्षिण भारतात अनुवाद रुपात 'श्री महाभक्त विजयम ' नावाने आज ही तेथील भाविक सश्रद्ध पणे पाठ करीत आहेत. 

उत्तर भारतातील संतांच्या कार्याचा परिचय भक्तविजय या ग्रंथाच्या दक्षिणेतील सर्व भाषेत ‘श्री माह भक्तविजम’ नावाने तेथील आम जनतेला झाला आहे.परकीय गुलामगिरीत स्वधर्माचा प्रकाश अखंड तेवत ठेवण्याचे पवित्र राष्ट्रीय कार्य संत महिपती यांच्या संतचरित्र कार्य मुळे शक्य झाले होते.महाराष्ट्रात छत्रपति शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य चळवळीत संत महिपती यांनी मोलाचे कार्य करून युवा शक्ति हिंदवी स्वराज्या साठी उभी केली होती.


"भक्त विजय" ग्रंथात संत जयदेव, तुलसीदास, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, चोखामेळा, कबीर, रोहिदास, नरसी मेहता, रामदास, सेना, मीराबाई, भानुदास, इत्यादी अनेक संतांच्या जीवन कार्य वर आधारित कथा आहेत. 


 भक्त विजयचे बहुतेक सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे.  हा कोट्यावधी भाविकांना प्रेरणा देणारा अमूल्य ग्रंथ आहे. तो आजही भारतात अनेक मंदिरात नित्यपाठ व हरिकथा संकीर्तन यासाठी वाचला जातो.


संत महिपती बुवा संत चरित्रकार होते परंतु ते संत चरित्र सुस्वर संगीत ताला वर गायन करीत व भक्तांचा प्रचार करीत. या विषया वर ऑक्सफ़ोर्ड संदर्भ सेवा अंतर्गत इंग्लिश लेख प्रकाशित आहे.


https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803100126761केल्याने 


देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,

मनुजा, ज्ञान येतसे फार ... "


संत चरित्र वर्णन करताना संत महीपति यांनी संत कबीर यांच्या रचनांचा अभ्यास केला होता. तत्कालीन हिंदी भाषेला त्यांनी 'हिंदुस्थानी' संबोधले आहे व ती आपली 'देशभाषा' आहे असे वर्णन केले आहे. महाराज बहुभाषी होते,त्यांना मराठी,संस्कृत,हिंदी,कन्नड व इतर भारतीय भाषा यांचा परिचय होता. संत चरित्र लिखाण करण्या आधी भारतातील अनेक तीर्थ क्षेत्र त्यांनी पाया खाली घातले होते. त्यामुळे त्यांच्या चरित्र लिखाण हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक भाषेत पोहचले होते,याचे अनेक संदर्भ साहित्यात उपलब्ध आहेत. 

ज्ञान प्राप्ति करीता पर्यटन व भारतीय संस्कृतिचे सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अनेक भाषा परिवारातील विद्वानांनाचे सान्निध्य आवश्यक असते हे महिपती महाराज यांनी जाणले होते. खरा सच्चा संत हा सर्व भाषेशी मैत्री ठेवतो. वर्तमान काळी सर्वांनी भाषा भेद, जातीभेद वर्ज्य केला तर ज्ञान, भक्ती,विकास होणार हे निश्चित आहे. 


संदर्भ-

जे भक्त अवतरले पृथ्वीवरी ॥ तेचि कलियुगामाझारी ॥ प्रकट झाले तारक ॥१६॥ त्यांचीं चरित्रें वर्णावयास ॥ मज वाटला बहु उल्हास ॥ आतां श्रोते हो सावकाश ॥ द्यावें अवधान मजलागीं ॥१७॥ नेणें मी कांहीं चातुर्य व्युत्पत्ती ॥ नव्हें मज बहुश्रुत अध्यात्मग्रंथीं ॥ नेणें संस्कृतवाणी निश्चितीं ॥ श्रीरुक्मिणीपति जाणतसे ॥१८॥ मागें संतवरदानीं ॥ एकनाथ बोलिले रामायणीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥१९॥ नामदेवमुक्तेश्वरांनीं ॥ भारतीं वर्णिला चक्रपाणी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२०॥ श्रीभागवतीं टीका वामनी ॥ हरिविजय केला श्रीधरांनीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२१॥ बोधराज रामदासांनीं ॥ गीतीं आळविला कैवल्यदानी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२२॥ गणेशनाथ केशवस्वामी ॥ साळ्या रसाळ प्रसिद्ध जनीं ॥ कबीर बोलिले हिंदुस्थानी ॥ देशभाषा आपुली ॥२३॥ ऐसे संत प्रेमळ जनीं ॥ ज्यांचे ग्रंथ ऐकतां श्रवणीं ॥ अज्ञानी होती अति ज्ञानी ॥ नवल करणी अद्भुत ॥२४॥

(संत महीपति कृत श्री भक्तिविजय ग्रंथ)

जो भक्तिनाथ बैराग्यपुतळा । ज्याचे अंगी अनंत कळा ।।

 तो सदगुरु तुकाराम आम्हांसी जोडला |

 स्वप्नी दिधला उपदेश ।।

 ( भक्तिलीलामृत अध्याय १-२० )


 स्वप्नात झालेली तुकारामांची आज्ञा हा ईश्वरी . दृष्टांत आहे , असे समजून महिपतीबुवांनी संतांची चरित्रे लिहिण्यास आरंभ केला .

 महाराष्ट्रात सन 1885 ते 1910 काळात 'ज्ञानोदय' या ख्रिश्चन धर्म पत्रिकेचे संपादक रे.जस्टीन एडवर्डस अँबट यांनी महिपती महाराजांच्या 'भक्त विजय' 'भक्त लीलामृत' व 'संत विजय' या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले आहे. महिपती बुवाच्या या संत चरित्रांचा परिचय रे.अँबट यांनी अमेरीकन विद्वानांना करुन दिला. ख्रिश्चन धर्म प्रचारक असुन सुध्दा त्यांनी मराठी संतांचा गाढा अभ्यास केला होता. रे.अँबट यांचे इंग्रजी भाषांतर महाराष्ट्र कवी संत माला (The poet saints of Maharashtra series) या नावांने सुप्रसिद्ध आहे. 'भक्त विजय' ग्रंथाचा अनुवाद करताना त्यांनी डिक्टाफोनचा वापर केला होता. या डिक्टाफोनवर शब्द बद्ध केलेले त्यांचे भाषांतर नंतर कागदावर उतरवले गेले. शनिशिंगणापुराचे नाव भारतात सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. महिपती महाराजांनी 'शनी महात्म्य' ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. 


भारतभर विविध ठिकाणी भ्रमंती करून २८४ संतांचे चरित्र लिहिणारे संतकवी महिपती महाराज यांचा एकमेव हस्तलिखित ग्रंथ श्रीक्षेत्र ताहाराबाद (ता़ राहुरी) येथे २५२ वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आला आहे. ‘श्री भक्तीविजय’ असे ग्रंथाचे नाव असून ,महिपती महाराजांचे वंशज पांडुरंग कांबळे यांनी तो देवस्थान ट्रस्टकडे दिलेला आहे. १७६२मध्ये महाराजांनी लिहिलेल्या श्री भक्तीविजय ग्रंथामध्ये ५७ अध्याय असून, ९९१६ ओव्यांचा समावेश आहे़ बाजरीचे दाणे जाळून त्यापासून तयार केलेल्या शाईच्या साहाय्याने वळणदार अक्षरात ग्रंथनिर्मिती केली असल्याची माहिती संस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे यांनी दिली़ पांडुरंगाची मूर्ती समोर ठेवून महिपती महाराजांनी १५ ग्रंथांची निर्मिती केली. महाराजांचे एकमेव हस्तलिखित ग्रंथ असल्याने त्याचे जतन करण्यात येणार असल्याचे संस्थान ने स्पष्ट केले आहे. 



मराठी साहित्याचा प्रवाह संत चरित्रातून त्यानी प्रवाहित केला. त्याच महिपतीच्या जन्मगावी आज मोठे प्रशस्त भव्य मंदिर उभे आहे. संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रावसाहेब साबळे पाटील दरवर्षी निष्ठेने ताहराबाद ते पंढरपुर पायी पालखी काढतात. या पालखीमध्ये राहुरी, श्रीरामपुर, संगमनेर, पारनेर, व अहमदनगर येथील हजारो विठ्ठल भक्त सामिल होतात. या ट्रस्टमधे महिपती महाराजांच्या वंशातील श्री.अविनाश मुरलीधर कांबळे, ह.भ.प.पांडुरंग जनार्धन कांबळे व श्री.संजय तुकाराम कांबळे यांचा समावेश आहे. 

महिपती महाराजांचे अनेक ग्रंथ अद्याप अप्रकाशित आहेत. काही हस्तलिखिते महाराजांच्या वंशजांकडे भक्तिभावाने सांभाळून ठेवली आहेत. महिपती यांचे हस्ताक्षर सुंन्दर आहे. महाराजांच्या अनेक पोथ्या पुणे, मुंबई येथील संशोधकानी हस्तगत केल्या आहेत. कांबळे घराण्यातील बहुतेक कुटुंबे पोटा पाण्यासाठी व्यवसायानिमित महाराष्ट्रात, कर्नाटकात व मध्य प्रदेशात पांगले आहेत.

श्रीक्षेत्र ताहराबाद येथील उत्सव आषाढ शुध्द १० पासुन अमावस्ये पर्यंत असतो. त्रेयोदशीला काला, चतुर्दशीस तळीत पहाटे पाऊलघडीची पुजा झाली की उत्सव संपतो. पाऊलघडी म्हणजे महिपती महाराजांच्या पाऊलांचे लाल ठसे धवल वस्त्रावर प्रकटतात अशी ग्रामस्थांची श्रद्दा आहे. या श्रद्देला आधार काय असु शकतो याचा विचार केला की वाटते महिपती बुवांनी पंढरीची पायवारी कधी चुकवली नाही. विठ्ठालाच्या दर्शनाला जाताना महाराजांच्या पायात काटे रुतत असावेत व रक्ताळलेल्या पावलांनी ती वारी संपन्न होत असावी. त्याचीच आठवण येथील सश्रद्द भाविक पाऊलघडी कार्यक्रमा द्वारे व्यक्त करीत असावेत. 

मी एका उत्सवाला गेलो होतो. तेथील ग्रामस्थांनी रचलेले सोंगे पाहुन चकित झालो. दिवसभर शेतात राबणारे अडाणी शेतकरी सोंगे आणताना असा काही अभिनय करतात की राजस्थानी राजपुताचे घोड्यावर स्वार होत केलेले सोंग मी कोणत्याच नाटकात, चित्रपटात पाहिलेले नाही. महिपती बुवांना मराठी भाषे व्यतिरीक्त गुजराती, हिंदी व कानडी भाषा अवगत होती. संपूर्ण भारत भ्रमंतीतुन त्यांनी त्याकाळी विविध भागातील लोक कलेचा संस्कार आपल्या ताहराबादला आणला होता. 

या उत्सवात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनाकार एकत्र जमतात. नासिक येथील ह.भ.प. बावीकर यांच्या किर्तनाने भारावुन मी बाल सुलभ प्रश्न केला होता की "आपल्या हिंदु धर्मात केसरी रंगाला विशेष महत्व आहे तसे मुस्लीम धर्मात हिरव्या रंगाला महत्व का आहे ?" माझ्या प्रश्नावर गंभीर चिंतन करताना ते म्हणाले की " बाळ, रंगांचे महत्व आपल्या संस्कृतीत भौगोलिक कारणाने प्राप्त झालेले आहे. हे बघ, मुस्लीम धर्माचा प्रथम प्रसार अरबस्थानातील वाळवंटात झाला. ते ओयासीसला अर्थात हिरवळीला फार पवित्र मानतात. त्यामुळे हिरवा रंग त्यांना शुभ वाटतो. हिरवा रंग हिंदु धर्मात संपन्नतेचा दर्शक आहे. आपल्या बायका शुभ प्रसंगी हिरवा चुडा परीधान करतात. आपण सुर्याला मानतो त्यामुळे उगवत्या सुर्याचा केसरी रंग आपल्याला शुभ वाटतो.!" 

वारकरी संप्रदयालील संतांचे उदार धोरण व हिंदु धर्मातील कर्मकांडाला त्यांनी केलेला तीव्र विरोध प्रकर्षाने भावतो.नाम स्मरण व सदाचार हिच ईश्वर सेवा ते मानतात. सुख सुविधे मुळे आज आपण बंगला, गाडी, पैसा, नोकरी, व्यवसाय,सत्ता, राजकारण यालाच देव मानु लागलो आहोत.कदाचित तुम्ही नास्तिक असाल परंतु मानवता, बंधुता व प्रेम या मानवी मुल्यांच्या मुर्तीचा विध्वंस करुन स्वत:चे मोठेपण सिध्द करु शकणार नाहीत.संतांचे हे मोठेपण आपण कधीच खुजे करु शकणार नाही. भारतीय संस्कृतीचे मुल्य अबाधित ठेवण्यात संतांचा फार मोठा वाटा आहे हे विसरुन चालणार नाही. अशा सर्व संतांचा परिचय आपल्याला करुन देणारे संत चरित्रकार महिपती बुवांचे उपकार कोणालाच विसरता येणार नाहीत. ताहराबाद येथील संत महिपती देवस्थान ट्रस्टचा कारभार वाढला आहे. दरवर्षी ताहराबाद येथुन पंढरपुरला भव्य पालखी व पायी वारी निघते. याचे सुंदर नियोजन होत आहे. ट्रस्टने महाराजांच्या साहित्य संपदेचे मुद्रण करुन सर्व मराठी भाविकांना अल्प किंमतीत उपलब्ध करुन द्यावे. मराठी भक्ती साहित्याचे हे भांडार आता तरी खुले केले पाहिजे. ताहराबाद येथील देवस्थानात त्यांच्या जीवन चरित्रावर आधारीत चित्रमय गँलरी उभी राहावी व तेथे एका दुर्लक्षीत संत महिपती बुवांचे गांव हे धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे हीच सदिच्छा व संत महिपती बुवांच्या चरणी शतश: वंदन.


~  विजय प्रभाकर नगरकर

  अहमदनगर

   vpnagarkar@gmail.com

9422726400

(ताहराबादकर)


गुरुवार, 13 अगस्त 2020

संत महीपति परिचय - स्व जगन्नाथ आजगांवकर

स्व श्री जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर, मुम्बई यांनी 1944 साली मुम्बई विद्यापीठ  मराठी पाठ्य पुस्तक " महीपति कृत एकनाथ व तुकाराम चरित्र " मधील संत महीपति महाराज यांचा परिचय।

महीपति 

महिपतिच्या वाणीते सेवुनि तरतात जैवि गंगेतें । 
विषयांत रंगलें जें जनमानस सद्यशींच रंगे तें ॥ - मोरोपंत 
“ महीपतीनी लिहिलेल्या कवितेचे सेवन करून , गंगेचे सेवन केल्या प्रमाणे लोक तरतात , आणि विपयोपभोगांत रंगून गेलेले मन साधुसंतांच्या यशोगानांत रंगून जाते , " असा , महीपतींच्या काव्यसरितेविषयी रसिक शिरोमाणि कविवर्य मोरोपंत यांनी वरील सुंदर आर्यंत जो अभिप्राय व्यक्त केला आहे तो अगदी योग्य आणि ययार्थ आहे असे कोण म्हणणार नाही ? संत चरित्रकार या नात्याने तर महाराष्ट्र कविमंण्डलांत महीपतींचे स्थान अगदी स्वतंत्र आहे . जुन्या साधूंची चरित्रे अर्वाचीन पद्धतीने लिहूं इच्छिणारास देखील महीपतींच्या ग्रंथांचे साहाय्य घेतल्याशिवाय गत्यंतर नाही इतकें सांगितले म्हणजे वाचकांस त्याच्या कामगिरीची कल्पना होईल . आपल्या कालापूर्वी उभ्या हिंदुस्थानांत होऊन गेलेल्या बहुतेक सर्व साधुसंतांची चरित्रं महीपतींनी आपल्या संतचरित्र पर चार मोठ्या ग्रंथात इतक्या रसाळ वाणीने वर्णिली आहेत की , अर्वाचीन पद्धतीची संतचरित्रे यापुढे कितीही बाहेर पडली तरी महीपतींच्या ग्रंथांची लोकप्रियता लवलेशही कमी होण्याचा संभव नाही . बहुजनसमाजास जो प्रेमळपणा पाहिजे , जो रसभरितपणा पाहिजे , जो प्रसाद पाहिजे ते गुण आम्हा अर्वाचीन लेखकांच्या लिखाणांत कसे येणार ? रूक्ष तर्ककर्कशता आणि वाजवीपेक्षा अधिक विचिकित्सा यांच्या भरीस श्रद्धाहीनतेची जोड मिळाल्यावर , प्रेमळपणा आणि रसोत्कर्ष यांची अपेक्षा करणे हे सहाराच्या वाळवंटात नंदनवनाची अपेक्षा करण्याइतकेंच मूर्खपणाचे आहे . जुन्या संतकवीचे ग्रंथ महाराष्ट्रातील बहुजनसमाज अद्याप मोठ्या आवडीने वाचतो आणि आमच्या ग्रंथांकडे पाहून नाक मुरडतो याचे कारण हेच होय . गेल्या सातशे वर्षांत शेंकडों संतकवि महाराष्ट्रांत होऊन गेले व त्यांतले पांचदहा कवि फार लोकप्रिय आहेत , परंतु त्यांतल्यात्यांत श्रीधर आणि महीपति यांचेच ग्रंथ महाराष्ट्रात अद्याप फार वाचले जातात . किंबहुना श्रीधर आणि महीपति यांनी महाराष्ट्रांतील बहुजनसमाजाच्या धार्मिक आणि नैतिक शिक्षणाची कायमची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे असे म्हण ण्यांत फारशी अतिशयोक्ति होणार नाही . तर अशा या थोर सत्कवीचें संक्षिप्त चरित्र आरंभी देऊन नंतर त्याच्या कवितेच्या गुणदोषांची यथामति चर्चा करूं .

 महीपतींचे वडील दादोपंत कुळकर्णी हे मोगलांच्या पदरी होते . तिकडून आपल्या वयाच्या ४० व्या वर्षी ते हल्लीच्या अहमदनगर जिल्ह्यांतील ताहराबाद नामक गांवीं येऊन राहिले . अहमदनगर , ताहराबाद इत्यादि नांवांवरूनच या प्रांतांत एका कालीं मुसलमानाचे किती वर्चस्व होते याची कल्पना होण्या सारखी आहे . दादोपंत हे ताहराबाद येथे येऊन राहिल्यावर , तेथे ते स्नान संध्या , देवदेवतार्चन इत्यादि धर्मकार्य करून कालक्षेप करीत असत . दर महिन्यास पंढरीची वारी करण्याचा त्यांचा क्रम होता व तो त्यांनी निर्विघ्नपणे दोन तपें चालविला . पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे आपल्यामागे वारी बंद पडेल असा विचार त्यांच्या मनांत येऊन , एकदां पंढरीस असतांना , श्रीविठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणाले , “ भगवंता , वारी चालू राहण्याची व्यवस्था होईल तर बरे होईल . ” पुढे रात्रौ ते देवळांतील एका ओरीत निजले असतां , असा चमत्कार झाला म्हणून सांगतात की , श्रीविठ्ठलाने स्वप्नांत त्यांच्या हातांत एक पेढा दिला व हा आपल्या पत्नीस खावयास द्या " असे सांगितले . दादोपंत जागे होऊन पहातात तो हातांत खरोखरच पेढा आहे ! मग ते ताहराबादस गेले आणि तो पेढा त्यांनी आपल्या पत्नीस खावयास दिला . लवकरच ती गर्भवती झाली . ताहराबाद येथे महीपतींचा जन्म सन १७१५ ( शके १६३७ ) त झाला ; दादोपंतांची साठी उलटल्यावर त्यांनी हे पुत्रमुख पाहिले . महीपति हे ऋग्वेदी वाशिष्ठ गोत्री देशस्थ ब्राह्मण ; आडनांव कांबळे . महीपति रूपाने फार सुंदर होते तसे बुद्धीनेही चलाख होते . त्यांचा बांधा सुदृढ होता . बाळपणचे खेळ म्हणजे भजन पूजन . दगडाच्या चिपळ्या घेऊन ते भजन करीत . ते पांच वर्षाचे झाले तेव्हां त्यानी वडिलांपाशी पंढरपुरास जाण्याचा हट्ट घेतला . वडील अशक्त झाले होते म्हणून त्यांनी आपल्या विश्वासाचा एक कासार व दोन ब्राह्मण बरोबर देऊन महीपतींस पंढरपुरास पाठविले . तेथे त्यांनी श्रीपांडुरंगाचे दर्शन घेतले व क्षेत्रप्रदक्षिणा केली . महीपतींचे शिक्षण बरेच झाले होते . त्यांनी स्वहस्ते लिहिलेले ग्रंथ उप लब्ध आहेत त्यांतील त्यांचे हस्ताक्षर चांगले आहे . ' कथासारामृत ' हा आपला ग्रंथ त्यांनी संस्कृत पुराणग्रंथांच्या आधाराने लिहिला आहे यावरून त्यांना संस्कृत भाषा अवगत असावी हे उघड दिसते . मात्र , एकनाथ , मुक्तेश्वर , वामन , मोरोपंत यांच्यासारखे ते मोठे व्युत्पन्न पंडित होते असे मानण्यास आधार नाही . मराठी तर त्यांची मातृभाषाच होती , पण त्याशिवाय , गुजराथी , हिंदी व कानडी याही भाषा त्यांस अवगत होत्या . आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या ठळक मराठी कवींची कविता त्यांनी लक्षपूर्वक वाचली होती हे त्यांच्या ग्रंथांवरून दिसते . महीपति आपल्या वयाच्या १६ व्या वर्षापासून कुळकरणाचे काम करूं लागले . ताहराबादचे कुळकर्ण व जोशीपणा ही त्यांच्या घराण्याकडे होती . ताहराबाद हा गांव एका मुसलमानाचा जहागिरीचा गांव होता . त्याच्या कचेरीत महीपतींस नित्य जावे लागत असे . एके दिवशी ते कचेरीतून आल्यावर , स्नान करून देवपूजेस बसले असतां जहागिरदाराचा शिपाई त्यांस बोलावण्यास आला . ' देवपूजा आटोपतांच येतो ' असें महीपतींनी त्यास सांगितले . इत क्यांत आणखी दोन बोलावणी आली . तेव्हां तो यवन शिपाई त्यांस कांहीं उणेअधिक शब्द बोलला . ते ऐकून महीपतींस फार वाईट वाटले . पूजा आटोपल्यावर ते जहागिरदाराच्या वाड्यांत गेले व तिकडचे काम संपवून घरी कानास लेखणी होती ती देवापुढे ठेवून त्यांनी शपथ वाहिली की आजपासून गांवकामांत लेखणी हाती धरणार नाही . ” ही शपथ शेवटपर्यंत त्यांनी पाळली व त्यांचे वंशजही ती पाळीत आले आहेत , व सात पिढ्यांपर्यंत ती तशीच पाळली जावयाची आहे . महीपतीस विठ्ठलबोवा व नारायणबोवा असे दोन पुत्र होते . पैकी विठ्ठलबोवा हे गवयी असून दुसऱ्या बाजीरावांचे आश्रित होते ; व त्यामुळे ते पुण्यास रहात असत . महीपतींचे वंशज हल्ली ताहराबाद येथे आहेत , त्याच्यापैकी काही कीर्तन फार चांगले करितात . 

महीपतींचा वंशवृक्ष येणेप्रमाणे : दादोपंत + गंगाबाई आल्यावर , महीपति ( चरित्रनायक ) विठ्ठलबोवा नारायणबोवा 1 गंगारामबोवा उदाराम आत्माराम सीताराम अण्णाबोवा महीपति रंगनाथ  

मोरोपंत , अमृतराय , मध्वमुनीश्वर , रामजोशी , मोरोपंत , सोहिरोबा , शिवदिन केसरी , देवनाथ हे सर्व कवि महीपतींचे समकालीन होत ; मात्र यांपैकी कोणाशी त्यांचा परिचय होता की काय , यासंबंधाची माहिती उपलब्ध नाही . मोरोपंत महीपतींहून १४ वर्षांनी लहान होते . महीपतींच्या पत्नीचे नांव काय होते हे कोठेही नमूद केलेले आढळत नाही . दादोपंतांचा वृद्धापकाल झाल्या मुळे त्यांची पंढरीची वारी महीपतींनी पुढे चालविली . पंढरपूर , पांडुरंग आणि वारकरी साधुसंत यांच्या संबंधाने तुकारामबुवांच्या पश्चात् , महीपतींनी जितकें वाङ्मय लिहिले तितकें दुसऱ्या कोणी लिहिले नाही . महीपतींची पंढरीची वारी कधी चुकली नाही . त्यांच्या वृद्धापकाली ते एकदां पंढरपुरास जात असतां घोड्यावरून पडले तेव्हा त्यांच्या इष्टमित्रांनी त्यांस परत घरी आणले , त्या वेळी त्यांनी पांडुरंगास एक लहानसे ओवीबद्ध पत्र पाठविले ते याच लेखांत पुढे दिले आहे . तुकारामबुवांनी आपणास स्वप्नांत दृष्टांत देऊन संतचरित्रं गाण्याची आज्ञा केली असे मही पति म्हणतात . 

नमूं सद्गुरु तुकाराम । जेणे निरसिला भवभ्रम । आपुले नामी देऊनि प्रेम । भवबंधन निरसिलें ॥३ ॥ -भक्तविजय , अध्याय १ ला “ ज्याने मस्तकी ठेविला अभयकर । दुस्तर भवाब्धि केला पार । तो तुकाराम सद्गुरु वैष्णववीर । ग्रंथारंभी नमस्कार तयासी ॥ मृत्युलोकी दाविली अघटित करणी । देहासमवेत गेले वैकुंठभुवनीं । अद्यापि शुद्ध भाव देखोनी । देती स्वप्नी उपदेश ।। -संतलीलामृत , अ ० १ ला .
या ओव्यांत स्वतः महीपतींनी जी गोष्ट स्पष्टपणे नमूद केली आहे तिच्या सत्यत्वासंबंधाने शंका घेण्याचे काही कारण आहे असे मला वाटत नाही . तुकोबांनी आपल्या निर्याणानंतर बहिणाबाई , निळोबा व कचेश्वर यांनाही असेच दृष्टांत दिल्याच्या कथा ग्रंथांतरीं वर्णिल्या आहेत . तुकाराम बुवांस महीपतीसारखा प्रेमळ शिष्य चांगला शोभतो यांत संशय नाही . मही पतींनी शेकडों संतांची चरित्रे लिहिली आहेत , परंतु त्यांनी लिहिलेल्या तुकाराम चरित्राइतके सुंदर जुने संतचरित्र मराठी भाषेत दुसरे नाही .
 महीपतींचा पहिला संतचरित्रावषयक ग्रंथ भक्तविजय हा शके १६८४ या वर्षी पूर्ण झाला . त्या वेळी त्यांचे वय ३७ वर्षांचे होते . अर्थात् त्यापूर्वी थोडे दिवस महीपतींस तुकोबांचा दृष्टांत झाला असावा . तुकारामबुवा हेच आपचे गुरु होत असें महीपतींनी इतत्रही सांगितले आहे :
 सद्गुरु तुकाराम समर्थ । अंतरसाक्ष चैतन्यनाथ । तेणे होवोनि हृदयस्थ । आठव माते दीधला ॥१० ९ ॥ -संतलीलामृत , अ . ३५ वा . सद्गुरु तुकाराम समर्थ । तयासि माझा प्रणिपात । ज्याने अवतार घेवोनि मृत्युलोकांत । दाविला भक्तिपंथ साधकां ॥१४ ॥ N * जो भक्तिज्ञानवैराग्य पुतळा । ज्याच अंगी अनंत कळा । तो सद्गुरु तुकाराम आम्हांसि जोडला । स्वप्नी दिधला उपदेश ॥२० ॥ मी तरी सर्वाविषयी हीन । ऐसे साक्ष देतसे मन । परी कृपा केली कवण्या गुणें । त्याचे कारण तो जाणे ॥ २१ ॥ -भक्तलीलामृत , अ ० १ ला .
 महात्मा येशू ख्रिस्त यास क्रुसी देण्यात आल्यामुळे तो मृत्यु पावला व त्यानंतर तीन दिवसांनी त्याने आपल्या आईस व शिष्यांस दर्शन दिले अशी कथा खिस्ती पुराणांत वर्णिली आहे . आमच्या काही संतांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असावा . असो . महापतींचा पहिला ग्रंथ भक्तविजय होय हे पूर्वी सांगितलेच आहे . मही पतीनी लिहिलेली एकंदर कविता येणेप्रमाणे : 
ग्रंथ पद्यसंख्या रचनाकाल १ भक्तविजय , अ .५७ ओव्या ९९ १६ शके १६८४ ५३५ ९ ३ भक्तलीलामृत ,, ५१ १०७ ९ ४ ४ संतविजय २६ ४६२८ ५ कथासारामृत , अ . ३६ ७२०० १६८७ ६ पंढरीमाहात्म्य , १२ ७ अनंतव्रतकथा २ संतलीलामृत , " " 
१५ : ८ दत्तात्रेयजन्म ९ तुलसीमाहात्म्य अ ० ५ ७६३ १० गणेशपुराणाचा काही भाग , अ . ४ ११ पांडुरंगस्तोत्र १०८ १२ मुक्ताभरणव्रत १३ ऋषिपंचमी व्रत १४२ १४ अपराधनिवेदनस्तोत्र १०१ १५ अभंग व स्फुट पदें या एकंदर ग्रंथाची पद्यसंख्या सुमारे ४०००० होईल .
 भक्तविजयांत ज्या संतकथा वर्णन करावयाच्या राहिल्या त्यांचा संग्रह करावा म्हणून महीपतींनीं ' संतलीलामृत ' हा दुसरा ग्रंथ लिहिला , हे पुढील ओव्यांवरून दिसतें : आतां कलियुगामाजी निश्चिती । बौद्ध अवतार धरी श्रीपति । तरी अज्ञानी जन कैसे तरती । मग अवतार संती घेतले ॥ ६२ ॥ त्यांचे चरित्र यथापद्धती । तें वर्णिले भक्तविजय ग्रंथीं । परी ते कदा संपूर्ण न होती । आस्था चित्तीं दुणावे ॥ ६३ ॥ असंख्य ईश्वराच्या विभूति । संख्या करितां न पुरेचि मती । अंगीचे रोम आहेत किती । ते न गणवती सर्वथा ॥६४ ॥ परी एक सांगतों आपुलें मत । भक्तस्तवनी रमले चित्त । यालागी संतलीलामृत । दुसरा ग्रंथ आरंभिला ॥६५ ॥ भक्तविजयांत राहिली चरित्रे । ती येथे ऐकावी सविस्तर । बुद्धीचा दाता रुक्मिणीवर । सर्व भार तयावरी ॥ ६६ ॥ या ओव्यांत भक्तविजयानंतर संतलीलामृत लिहिले असे स्पष्ट सांगितले आहे , पण १८८६ साली मारुती जनार्दन दांडेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या व त्यांच्याच प्रतीवरून पुढील तीन प्रकाशकांनी छापलेल्या ' संतलीलामृता'च्या अखेरीस ग्रंथसमाप्तिकाल शके सोळाशे एकूणऐशीं । सर्वजित नाम संवत्सरासी । फाल्गुन शुद्ध चतुर्थीसी । ग्रंथ सिद्धीसी पावला ॥ असा दिला आहे . पण यांतला ‘ एकोणऐशी ' हा पाठ चुकीचा असून , महीपतींच्या स्वदस्तुरच्या हस्तलिखित प्रतीत ' शके सोळाशे नव्यायशीं ' असा पाठ आहे .

 संतलीलामृतानंतर महीपतींनीं ' भक्तलीलामृत ' हा सर्वांत मोठा संत कथाग्रंथ लिहिला . त्याच्या पहिल्या अध्यायांत ते लिहितात 
त्यांची चरित्रे व्हावया प्रख्यात । युक्ति केली पंढरीनाथें । मज पुढे करूनि निमित्त । श्रीभक्तविजय ग्रंथ वदविला ॥ दुसरा संतलीलामृतसार । त्यांतही चरित्रं वर्णिली फार । परी आणिक कथा राहिल्या अपार । मग रुक्मिणीवरें आज्ञापिलें । म्हणोनि भक्तलीलामृत जाण । ग्रंथ आरंभिला दुसऱ्याने । महीपतींचा संतचरित्रविषयक चौथा ग्रंथ '
 संतविजय ' हा अपूर्ण आहे अशी समजूत आहे . याचे २६ अध्याय असून त्यापैकी पहिल्या २५ अध्या यांत श्रीसमर्थ रामदासचरित्र विस्तारेंकरून वर्णिले आहे व २६ व्या अध्यायात बाबाजीबावा अरणगांवकर यांचे चरित्र दिले आहे . या ग्रंथाचा शेवटचा कलशाध्याय म्हणून १८ ९ ओव्यांचा एक अध्याय हल्ली छापला आहे , पण तो इतका अशुद्ध आहे की तो महीपतिकृतच आहे असे मान ण्यास मन प्रवृत्त होत नाही . हा ' संतविजय ' ग्रंथ महीपतिकृत नसून कोणी तरी रामदाससांप्रदायी गृहस्थाने तो महीपतींच्या नांवावर दडपून दिला असावा अशा अर्थाचा एक लेख प . वा . डॉ . प्रभाकर रामकृष्ण भांडारकर यांनी ' एक पुण्यकपट ' या सदराखाली ' विविधज्ञानविस्तार ' मासिकात पूर्वी प्रसिद्ध केला होता , पण खुद्द महीपतींनीच लिहिलेला ' संतविजय ' त्यांच्या वंशजांपाशी असल्यामुळे , तशी शंका घेण्याचे काही कारण नाही . महीपतीनी स्वहस्ते लिहि ' संतविजय ' अपूर्ण आहे असे त्यांच्या वंशजांचे म्हणणे आहे व उपलब्ध असलेल्या संतविजयाचे शेवटी ज्या अर्थी फलश्रुति व ग्रंथसमाप्तिकालनिर्देश नाही त्या अर्थी ते म्हणणे खरे असावे असे वाटते ; व यावरून सदर ग्रंथ पूर्ण होण्यापूर्वी महीपति स्वर्गस्थ झाले असावे असेंही वाटते . पूर्वी भक्तविजयांत रामदासस्वामींचे थोडेसें चरित्र महीपतींनी दिले लेला हा
. होते ; त्यानंतर त्या चरित्राची अधिक माहिती मिळत गेली व इतरांनी लिहि लेले समर्थचरित्रग्रंथ महीपतींच्या अवलोकनांत आले तेव्हां त्यानी संत विजयांत समर्थचरित्र विस्तारेकरून वर्णिले . कै . वि . का . राजवाडे यांनी ' सरस्वतीमंदिर ' मासिकांत " नाभाजीने व महीपतीने वर्णिलेले संत " या सदराखाली एक उपयुक्त यादी प्रसिद्ध केली आहे तीत त्यांनी महीपतींच्या ग्रंथांचा जो क्रम दिला आहे त्यांत भक्तविज यानंतर संतविजय झाला असे म्हटले आहे , पण हे विधान प्रमाणशुद्ध नाही हे खुद्द महीपतींनी दिलेल्या वरील ग्रंथरचनाक्रमावरून उघड दिसते . वरील ग्रंथाशिवाय महीपतींनी ' सारांश ज्ञानेश्वरी ' या नांवाचा एक ग्रंथ तयार केला आहे , त्यांत ज्ञानेश्वरीतल्या १४३१ निवडक ओंव्या दिल्या आहेत . ओव्यांची निवड करताना ' भक्ति ' या विषयावर महीपतींनी विशेष कटाक्ष ठेविला होता असे त्या ओंव्यांवरून दिसते . हा ग्रंथ पुणे येथील ' चित्रशाळे'नें प्रसिद्ध केला आहे . महीपति स्वभावाने फार नम्र , प्रेमळ आणि मोठे बहुश्रुत होते . सगुणोपासनेकडेच त्यांचा ओढा विशेष दिसतो . ते कट्टे वैष्णव - तुकाराम बुवांचे पूर्ण अनुयायी होते . अहिंसा , भूतदया आणि वसुधैव कुटंबकत्व हे गुण त्याच्या अंगी पूर्णत्वानें वास करीत होते . त्याच्या वेळी महाराष्ट्रांत मोठा दुष्काळ पडला होता त्यास ' करंज्याचें साल ' असे म्हणतात . या दुष्काळात महीपतींनी आपल्या घरावर तुलसीपत्र ठेवून ते गरिबांकडून लुटविलें ! ती हकीकत गांवच्या जहागिरदारास ( हा मुसलमान होता हे पूर्वी सागितलेच आहे ) समजतांच त्याने महीपतींकडे पुष्कळ गाड्या भरून साहित्य पाठविलें , परंतु त्याचा स्वीकार न करितां त्यानी आपला चरितार्थ भिक्षेवर चालविला . ह्याप्रमाणे दर तीन वर्षांनी आपले घर लुटविण्याचा क्रम त्यानी चालू ठेविला . पुढे लोकांनी सांगितले की हा आपला क्रम आपल्या पश्चात् चालणे कठिण आहे तरी जे निरंतर चालेल ते करावें . मग महीपतींनी ताहराबाद येथे श्रीविठ्ठलाचें मंदिर अयाचित वृत्तीने बाधिले व तेथे आषाढ वद्य १० पासून अमावास्येपर्यंत पांडुरंगाचा उत्सव करण्याची चाल सुरू केली ती अद्याप चालू आहे . तुकारामबुवानी स्वप्नात येऊन आपणांस दृष्टात दिल्याची हकीकत मही पतीनी आपल्या ओवीबद्ध ग्रंथांत सागितलीच आहे , पण एका स्वतंत्र अभंगा तही ती सागितली आहे :
बाळपणीं मरे माता । मग प्रतिपाळी पिता ॥ तैशापरी संभाळिलें । ब्रीद आपुले साच केले ॥ यात्रा नेली पंढरीसी । ध्यान ठविलें पायासीं ।। हृदयीं प्रकटोनी बुद्धि । भक्तविजय नेला सिद्धि ।। स्वप्नीं येउनी तुकाराम । आपुलें सांगितले नाम || महीपति म्हणे हरी । तुमच्या हाती सूत्रदोरी ।। एकदां पंढरपुरास जात असतां महीपति घोड्यावरून पडले व त्यामुळे त्यांना परत घरी यावे लागले त्या वेळी त्यांनी पांडुरंगास पुढील ओवीबह पत्र पाठविलें : जय क्षीराब्धिवासा अनंता । अनंतशायी मायातीता । भक्तवत्सल पंढरीनाथा । रुक्मिणीकांता श्रीविठ्ठल
या १० च ओव्यांवरून महीपतींच्या निरपेक्ष हरिभक्तीची आणि प्रेमळ पणाची साक्ष कोणासही पटण्यासारखी आहे . परदेशांत आजारी पडलेल्या मुलाने घरी आपल्या प्रेमळ पित्यास पत्र लिहावे तसे हे पत्र महीपतींनी पांडु रंगास लिहिले आहे . दगडाच्या मूर्तीत जर देवत्व नसेल तर असलें हे अत्यंत करुणरसभरित पत्र ऐकण्यासाठी तरी तें देवत्व मूर्तीत क्षणभर तरी उत्पन्न झाले असेल यात संशय नाही . भक्त भगवंताचे ठायीं किती समरस होऊ शकतात याचा हा सुंदर नमुना आहे . महीपतींनी आपले हृदय या पत्रांत साफ उकलले आहे . आणि महीपति देवापाशी मागतात तरी काय ? धनदौलत मागतात काय ? आरोग्य मागतात काय ? दीर्घायुष्य मागतात काय ? नाही . तर , “ संबंध तोडीं या देहाचा , " " मला मृत्यु येऊ दे " अमें मागतात . महीपतींच्या ग्रंथांत सर्वत्र जो इतका प्रेमळपणा वोसंडत आहे तो कोठून आला याचा उलगडा या एका ९ ओव्यांच्या पत्रावरून येतो . गंगाजलनिर्मल अशा हृदयांत प्रेमळ पणाशिवाय दुसरे काय असणार ? पायांनी पंढरपूरची वारी करण्याचे सामर्थ्य , वार्धक्यामुळे , आपल्या अंगीं उरले नाही याबद्दल महीपतीस फार दुःख होत असे . ते म्हणतात : अभंग सदां डोळ्यांपुढे राहो तुझे ध्यान । ऐसी इच्छा पूर्ण वाटे जीवा ॥ दैवावांचोनियां निष्फळ वासना । ऐसे नारायणा दिसताहे ।। तुझे यात्रे गमन घडावें चरणीं । नसे या प्राक्तनी करूं काय ॥ आहे जो शरीर घडो परोपकार । असत्य उत्तर न यो वाचे ॥ महीपति म्हणे दाखवीं ते सोय । जेणे भवभय निवारेल आमच्या साधुसंतांस “ अंतरसाक्ष जो चैतन्यघन परमेश्वर तो जीवाची निज खूण जाणतो , त्याला भेटण्यासाठी पंढरपुरासारख्या ठिकाणीच गेले पाहिजे असें नाहीं " हे समजत होते , पण सगुणभक्तीच त्यांना विशेष प्रिय असल्यामळे आपले ' आरुप ' पत्र पांडुरंगाकडे पाठविण्यास महीपतींस काही हरकत वाटर्ल नाही . महीपतींचे गुरु तुकाराममहाराज यांनीही असेंच पांडुरंगास एक अभंग बद्ध पत्र वारकऱ्यांबरोबर पाठविले होते . देवास पत्रे पाठविणे किंवा त्याच्याशी अन्य प्रकारे सलगी करणे म्हणजे त्याचा अपमान किंवा थट्टा करणे होय असे कित्येकांस वाटते , पण असल्या अपमानाबद्दल देवाने तुकोबांस किंवा महीपतींस एखादी भयंकर शिक्षा केली होती असा पुरावा ज्या अर्थी उपलब्ध नाही , उलट असले सलगी करणारे लोकच देवास विशेष प्रिय झाले होते असें दिसते , त्या अर्थी देवाच्या मानापमानाबद्दल आपणास काळजी करण्याचे कांही प्रयोजन नाही . महीपति शके १७१२ ( इ . स . १७ ९ ० ) श्रावण वद्य १ ९ या दिवशी दिवंगत झाले . त्या वेळी त्यांचे वय ७५ वर्षांचे होते . महाराष्ट्र कविवर्य मोरोपंत यांनी महीपतींचे ग्रंथ वाचले होते , परंतु त्या उभयतांची भेट कधी झाली होती की नाही , त्यांचा परस्पर पत्रव्यवहार होता की काय , हे समजण्यास काही मार्ग नाही . महीपतींचे पुत्र विठोब गोसावी यांची पंतांस गेलेली काही पत्रे उपलब्ध झाली आहेत त्यांवरून पंत व विठोबा याचा स्नेहसंबंध होता हे मात्र उघड दिसते . हे विठोबा गोसार्व पंढरपुरास बाबा पाध्ये यांजकडे विद्याभ्यासासाठी राहिले होते . बाबांनीच त्यांची शिफारस मोरोपंतांकडे करून त्यांचा परिचय करून दिला . बाबा पंतांस एका पत्रांत लिहितात : -- " हरिदास राजेश्री विठोबा गोसावी ताहराबादकर यांही आपणास पुस्तकाविषयी लिहिले . आपण ग्रंथ पाठवून द्यावे . ते प्रति करून आपणास शीघ्र परत करतील . " यापुढे पंत व विठोबा गोसावी यांच स्नेहसंबंध जडला व तो उत्तरोत्तर दृढ होत गेला पंतांनी आपल्या ' सन्मणि माले'त महीपतींचा उल्लेख केलेला नाही . पुढे विठोबा गोसावी ताहराबादकर यांच्या सूचनेवरून त्यांनी ' महीपतिस्तुति ' या नावाचे एक लहानसे प्रकरण लिहिले ते येथे देतो : आर्या श्रीहरिभक्तजनांची श्रीहरिभक्तिरससत्सुधाभरितें चरिते गातां जेणे आयुष्य क्षण पडों दिले न रितें ॥१ ॥ हरिभक्तविजय नामें रचिला सनथ दोष साराया । वाराया तापातें प्राणी भवसागरांत ताराया ॥२ ॥

त्या महिपतिते पाहुनि ऐकुनि सञ्चित्त कां न लोभावें । शोभावे यश ज्याचें चिर नमिला विष्णुदास तो भावें ॥३ ॥ ज्याचा ग्रंथ हरिजनां सेव्य चकोरां जसा सदा इंदु । जो पसरला जगांत स्नेहाचा सत्सरी जसा बिंदु ॥ ४ ॥ सत्य तुकारामाचा या महिपतिवरि वरप्रसाद असे । सदनुग्रहाविणे हे निघतिल उद्गार सार काय असे ॥ ५ ॥ साधूंचे यश गाया येणे देऊनियां सुभाकेला । निःसंशय ताराया जड महिपति विठ्ठले उभा केला ॥६ ॥ माहिपतिच्या वाणीत सेवुनि तरतात जेवि गंगेते । विषयांत रंगले जे जनमानस सद्यशींच रंगे ते ॥७ ॥ ज्ञानोबाची जैशी एकोबाची जशी सुधा वाणी । की मुक्तेश्वर कविची महिपतिची सेविती तशी प्राणी ॥८ महिपतिचा सुत विठ्ठल त्याला श्रीपांडुरंग आठव दे । तत्प्रेरणेकरुनियां आर्या आर्यादरार्थ आठ वदे ॥९ ॥ * स्वस्तुति केली म्हणवुनि महिपति हरिभक्त न विटोबा । मज तो वाटे ऐशा साधुजनांहूनि अन्य न विठोबा ॥ १० ॥ संतांसि नावडे स्तुति है ठावें मज परंतु देवास । महिपति म्हणेल विठ्ठलराया , या निजपदींच दे वास ॥११ ॥ श्रीविठ्ठलासि आहे साधूंची फार सर्वदा भीड । चीड प्रभुसि न येइल देइल मज करुनि निजपदीं नीड ॥ १२ ॥ अंजलि करूनि असतो गरुड उभा जेवि अहिपतिसमोर । हरिभक्तिप्रेमगुणे नम्र सदा तेंवि महिपतिस मोर ॥१३ ॥ या आर्यावरून महिपतींच्या योग्यतेविषयी पंतांच्या मनांत केवढा आदर भाव होता हे स्पष्ट दिसते . वरील तिसऱ्या आर्येत “ त्या महिपतिते पाहुनी " असे शब्द आहेत त्यांवरून पंतांनी महीपतींस पाहिले होते हेही उघड दिसते . वरील आर्यात फक्त ' भक्तविजय ' ग्रंथाचा उल्लेख आहे , महीपतिकृत इतर ग्रंथांचा नाही , यावरून व " स्वतःची स्तुति केली म्हणून महीपतींस विषाद न वाटो " अशा अर्थाच्या पंतांच्या उद्गारांवरून महीपतींच्या हयातीतच पंतांनी या * या चरणांत तीन मात्रांचा एक शब्द कमी आहे .

२२ आर्या रचिल्या असाव्या यांत संशय नाही . भक्तविजय ग्रंथ लिहून होतांच तो सगळ्या महाराष्ट्रांत कसा पसरला हे “ जो पसरला जगांत स्नेहाचा सत्सरी जसा बिंदु " या आर्याधीत पंतांनी सांगितले आहे . राजाराम प्रासादीकृत भक्तमंजरीमाला , अर्वाचीन भक्तलीलामृत , कै ० द . अ . आपटे ( कवि अनंततनय ) कृत कविचरित्र , नवनीत , चरित्रकोश , ज्ञानकोश , व महाराष्ट्र सारस्वत इतक्या ग्रंथांत महीपतींची थोडीबहुत माहिती दिलेली आढळते . मी माझ्या महाराष्टकविचरित्राच्या दुसऱ्या भागात , माहिपतींचे विश्वसनीय चरित्र विस्तारपूर्वक दिले असून त्याच्याच आधाराने प्रस्तुत लेख लिहिला आहे . असो . महीपतींच्या चरित्रासंबंधाची बहुतेक महत्त्वाची माहिती येथपर्यंत दिली . महीपतराव व नरहरि महीपति या नांवाचे आणखी दोन महीपति महाराष्ट्रांत होऊन गेले आहेत व त्यांपैकी नरहरि महीपति बरेच प्रसिद्ध आहेत . ' काव्य संग्रह ' मासिकांत महीपतींची म्हणून जी पदें प्रसिद्ध झाली आहेत ती बहुतेक सर्व या नरहरि महीपतींचीच होत . महीपतींनी आपले ग्रंथ फार शोधपूर्वक लिहिले आहेत . तत्कालीन परि स्थित्यनुसार में संशोधन करणे अवश्य होतें तें करण्यांत त्यांनी बिलकुल कसूर केलेली नाही . त्यांच्यापूर्वी काही लेखकानी संतचरित्रे लिहिली होती , त्यांचा उपयोग तर त्यांनी केलाच , परंतु स्वतः पुष्कळच नवीन माहिती मिळवून तिच्या आधाराने बहुतेक सर्व संतांची चरित्रे त्यांनी विस्तारपूर्वक लिहिली . महाराष्ट्रावर हे त्यांचे मोठे उपकार आहेत . महीपतींनी ही एवढी मोठी ग्रंथ रचना केवळ विषयाची आवड म्हणून किंवा आवडीचा विषय म्हणून , निरपेक्षबुद्धीने केली . ऐतिहासिक चरित्रग्रंथ लिहिण्यासाठी जो शोध आणि खटाटोप करणे अवश्य आहे तो सगळा त्यांनी केला होता . पुष्कळ संतांच्या गांवी जाऊन , त्यांच्या वंशजांस भेटून , त्यांच्या घरची दप्तरे व पोथ्या पाहून , दंतकथा व आख्यायिका ऐकुन जी माहिती उपलब्ध झाली तिचा समावेश त्यांनी आपल्या ग्रंथांत केला आहे . पाश्चात्य वाङ्मयाच्या परिचयामुळे जी एक प्रकारची ऐतिहासिक दृष्टि हल्ली आपणांस प्राप्त झाली आहे असे आपण समजतो ती महीपतींच्या अंगी अल्पांशाने तरी होती असे मानण्यास त्यांच्या ग्रंथांत पुष्कळ पुरावा आहे . चमत्कारादि गोष्टी त्यांनी आपल्या ग्रंथांत दिल्या आहेत , इतक्याचमुळे त्यांच्या ग्रंथांची योग्यता बिलकुल कमी होत नाही . चमत्कारांवर विश्वास ठेवण्याचा तो काल होता इतकेच नव्हे तर खुद्द महीपतींनी निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रकारचे पाचदा चमत्कार केले होते अशीही प्रसिद्धि आहे . अशा स्थितीत त्यानी , इतर साधूंनी केलेल्या अलौकिक चमत्काराच्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या आपल्या ग्रंथात नमूद कराव्या यात कांही आश्चर्य नाहॉ . शिवाय , अलौकिक चमत्कारांच्या सर्वच कथा झूट असेही मानण्याचे कारण नाही . कारण हा शास्त्रीय विषय आहे . ज्या योगशास्त्राच्या जोरावर असले अलौकिक चमत्कार करून दाखविले जातात तेंदेखील एक शास्त्रच आहे . अर्थात् यांत अशास्त्रीय असे काही नाही . मात्र अतिशयोक्ति असेल तर ती केव्हांही त्याज्यच आहे . असो . महीपतींची वागी फार रसाळ , प्रासादिक आणि साधी आहे . भाषा सोपी . जुने कठिण शब्द तीत फारसे नाहीत . दीडशे वर्षांपूर्वीच्या खेडवळ देशस्थ ब्राह्मणाच्या भाषेचा तो नमुना आहे . व्याकरणदृष्ट्या महीपतीची वाक्यरचना पुष्कळ ठिकाणी सदोष आहे , परंतु भाषाशुद्धीकडे बहुतेक जुन्या कवींनी अमळ दुर्लक्षच केलेले असल्यामुळे एकट्या महीपतींसच दोष देण्यांत अर्थ नाही . मुक्तेश्वरांची प्रतिभा महीपतींत नाही , वामनाची विद्वत्ता नाही , पंतांचे भाषाप्रभुत्व नाही , किंवा श्रीधराची रसोत्कटता नाही , परंतु प्रेमळ पणाच्या बाबतीत मात्र महीपतींचा हात धरणारा दुसरा मराठी कवि नाही . ज्ञानदेव , तुकाराम , एकनाथ आणि रामदास यांची महीपतींशी तुलना करणे अयोग्य होईल . महीपतींच्या ग्रंथांत भाक्तिरस नुसता उचंबळून राहिला आहे . ज्ञानदेवांप्रमाणे उपमा व दृष्टांत देण्याची महीपतीस फार हौस दिसते व त्यांच्या उपमादृष्टांतापैकी काही उपमा व दृष्टांत फार समर्पक आणि सुंदर आहेत यांत संशय नाही ; परंतु कोठे कोठे त्यांचा अतिरेक झालेला आहे हेही नमूद केल्याशिवाय गत्यंतर नाहीं . महीपतींच्या या भोळ्याभाबड्या बालबोध ग्रंथांनी महाराष्ट्रांत फार मोठे धर्मकार्य केले आहे . संतचरित्रे हा महीपतींचा अगदी आवडता विषय . संतचरित्रवर्णनपर चार मोठे ओवीबद्ध ग्रंथ लिहून त्यांचे समाधान झाले नाही म्हणून अभंगवृत्तांत त्यांनी काही संतचरित्रे पुनः गायिली आहेत त्यांची यादी येथे देतोः

 ४७ 59 " " नामदेवचरित्र अभंग ६२ जगमित्र नागाचरित्र हरिपाळचरित्र ५८ माणकोजी बोधलेचरित्र कमालचरित्र ६७ संतोबा पवारचरित्र १०२ नरसिंह मेहताचरित्र ५२ चोखामेळाचरित्र राका कुंभारचरित्र महीपतींच्या ओव्यांप्रमाणेच त्यांची पदें व अभंग फार सुरस आहेत . त्यांनी चार चरणी करुणापर अभंग लिहिले आहेत ते , आरत्या , पदें , इतर फुटकळ अभंग , गणेशचरित्र , काही फुटकळ ओवीबद्ध प्रकरणे , व वरील अभंगबद्ध संतचरित्रे इतकी त्यांची कविता अद्याप अप्रकाशित आहे . आपल्या बहुतेक मोठया ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथांतील प्रत्येक अध्यायांत कोणता कथाभाग आला आहे याची अनुक्रमणिका महीपतींनी दिली असून ती त्यांच्या सशास्त्र ग्रंथरचनापद्धतीची निदर्शक आहे . आपण जे काय लिहीत आहोत ते पांडुरंगाच्या कृपेने आणि तुकाराम बुवांच्या प्रेरणेने लिहीत आहोत असा महीपतींचा ठाम समज होता , त्यामुळे , स्वतःच्या कर्तबगारीसंबंधाने ज्यांत थोडासाही अहंभाव व्यक्त झाला आहे असा एक शब्दही त्यांच्या कवितेत आढळत नाही . कै . वि . ल . भावे यांनी लिहिलेल्या ' महाराष्ट्र सारस्वत ' ग्रंथांत महीपती विषयींची आणखी काही माहिती मिळाली तिचाही येथे संग्रह करितो . महीपतीस लहानपणापासून धर्माचे व विद्यचे बाबतींत मोरोबा तांभर कर नामक एका गृहस्थाश्रमी सत्पुरुषाची शिक्षा असे . महीपतिबाबांस श्रीमंत पंतप्रधान पेशवे यांजकडून व त्याच्या सरदारांकडून काही जमिनी इनाम मिळाल्या होत्या . त्यांच्या सनदा त्यांच्या वंशजांपाशी आहेत . ह्या सनदा शके १७१० नंतरच्या म्हणजे बाबांची विशेष प्रसिद्धि झाल्यानंतरच्या आहेत . हल्ली ही इनामें चालू नाहीत .
******
(स्व. जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर,मुम्बई)

सोमवार, 8 जून 2020

जयदेव

जयदेव जी एक वैष्णव भक्त और संत के रूप में सम्मानित थे। उनकी कृति ‘गीत गोविन्द’ को श्रीमद्भागवत के बाद राधाकृष्ण की लीला की अनुपम साहित्य-अभिव्यक्ति माना गया है। संस्कृत कवियों की परंपरा में भी वह अंतिम कवि थे, जिन्होंने ‘गीत गोविन्द’ के रूप में संस्कृत भाषा के मधुरतम गीतों की रचना की। कहा गया है कि जयदेव ने दिव्य रस के स्वरूप राधाकृष्ण की रमणलीला का स्तवन कर आत्मशांति की सिद्धि की। भक्ति विजय के रचयिता संत महीपति ने जयदेव को श्रीमद्भागवतकार व्यास का अवतार माना है।

Read more at: https://www.mymandir.com/p/m7uu0b

श्री भक्तविजय ग्रंथ परिचय

'श्रीभक्तविजय' महिपतीबुवांच्या ग्रंथांपैकी श्रीभक्तविजय हा ग्रंथ श्रेष्ठ होय . तो त्यांनी स्वतःच्या ४७ व्या वर्षी लिहिला . या ग्रंथात सुमारे पन्नास भक्तांच्या चरित्रकथा सांगितल्या आहेत . '
आधार टाकोनि आपुले मनीं ।बोलिलो नाही सर्वथा ।।'

 आधाराशिवाय काही लिहावयाचे नाही अशी त्यांची प्रतिज्ञाच होती . नाभाजीने ग्वालेरी भाषेत लिहिलेल्या संतचरित्रावरून , उद्धवचिद्धन यांनी लिहिलेल्या हकीगतीची भर घालून त्यांनी श्रीभक्तविजय हा ग्रंथ लिहिला . ते मुद्दाम खुलासा करतात : 

'म्हणाल , निजबुद्धीने त्वरित । आपुले मतीने लिहिला ग्रंथ । । तरी तैसे नव्हे हे निश्चित । विकल्प चित्ती न धरावा ।।जो उत्तरदेशी साचार । नाभाजी विरिंची अवतार ।। तेणे संतचरित्र ग्रंथ थोर । ग्वालेरी भाषेत लिहिला असे ।। 
आणि माणदेशी उद्धव चिद्घन त्यांहीं भक्तचरित्रे वर्णिली जाण ।।दोही संमत एक करून । भक्तविजय आरंभिला ।।'

 शिवाय आपल्या ग्रंथलेखनाचे श्रेय श्रीविठ्ठलाकडेच देऊन ते म्हणतात :

' जैशी आज्ञा केली रुक्मिणीवरे । तितुकीच ग्रंथी लिहिली अक्षरें ।। जैसा वाजविणार फुकितो वारे । तैसी वाजंत्रे वाजती ।।'

 महिपतींनी सगळा भक्तविजय ग्रंथ नाभाजीच्या ग्रंथाद्वारे लिहिला असे नाही . पंधराव्या अध्यायात नामदेव आणि त्यांच्या तीर्थयात्रेच्या प्रसंगाचे वर्णन करताना नामदेवांचे मावंदे स्वतः पांडुरंगाने घातले , असे सांगून महिपतीबुवा त्या ठिकाणी तीर्थावळीच्या अभंगांचा उल्लेख करतात . श्रीभक्तविजयात तुकारामचरित्र सर्व चरित्रात सुरस उतरले आहे .
(श्री भक्तविजय )
~शं रा देवळे

श्री भक्तविजय ग्रंथ समाप्ति भूमिका

संत महिपती यांनी ग्रंथ संपदा प्रत्येक घरी असावी असे आवाहन केले आहे. ज्या घरी ग्रंथ संपदा आहे त्या घरी,मंदिरी कोणते ही संकट येत नाही जसे विष्णू चे सुदर्शन चक्र संकटाचे निवारण करण्या करता घरटी घालीत आहे. ही एक विलक्षण उदाहरण बुवांनी दिले आहे.
 कली युगात जे संत चरित्राचे वाचन करतील त्यांच्या वर वैकुंठाची कृपा होईल. श्री भक्त विजय ग्रंथांची सांगता करताना महिपती बुवा सांगतात की विठ्ठल कृपे वरून मी या भूमीत बीज रोपले आहे, आता रोपटे येणे हे तुमच्या जीवन कर्मावर अवलंबून आहे.
~विजय प्रभाकर नगरकर (ताहाराबादकर)

श्री भक्त विजय ग्रंथातील मूळ सांगता जरूर वाचावी अशी आहे, ती खालील प्रमाणे-

॥२ ॥ ग्रंथसंग्रह करितां घरीं ॥ तरी विघ्ने न येती त्याचे मंदिरीं ॥ भोंवतें सुदर्शन घिरटी करी ॥ निश्चय अंतरी असों या ॥३ ॥ या ग्रंथामाजी हेचि कथन ॥ की भक्तांसी पावला जगजीवन ॥ म्हणोनि श्रोतयांवक्तयांकारण ॥ रुक्मिणीरमण | रक्षिता ॥४ ॥ कलियुगींची चरित्रे ऐकोनी ॥ सामान्य न म्हणावी विचक्षणीं ॥ कृतत्रेताद्वापारालागुनी । थोरथोर मुनी गातील ॥५ ॥ कलीचा प्रारंभ होतांचि त्वरित ॥ सुरवर आनंदले बहुत ॥ की औटघटिका करितां एकाग्र चित्त ॥ वैकुंठनाथ भेटेल की ॥६ ॥ तंव नारदमुनीने कौतुक केलें ॥ जिव्हा शिश्न हातीं धरिलें ॥ सकळ देवांसी आश्चर्य वाटलें ॥ मग पुसते जाहले तयासी ॥ ७ ॥ यावरी बोले ब्रह्मसुत ॥ हे दोन्ही नावरती कलियुगांत ॥ सुरवरी ऐकतां हे मात ॥ चिंताक्रांत झाले मानसीं ॥ ८ ॥ मग नारद सांगें तयांप्रती ॥ कलियुगी वैष्णव भक्त जे होती ॥ त्यांची चरित्रे जे ऐकती ॥ त्यांमी वैकुंठपती भेटेल ॥ ९ ॥ ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ विवुध आनंदले संपूर्ण ॥ म्हणती हे स्वल्प साधन ॥ आम्हांकारण मानलें ॥ २१०॥ म्हणोनि महर्षि आणि इंद्रादिकांसी ॥ भक्तचरित्र पावन तयांसी ॥ विचक्षणी वचनें ऐकूनि ऐसीं ॥ विकल्प मानसीं न धरावा ॥ ११ ॥ जैसी आज्ञा केली रुक्मिणीवरें ॥ तितुकींचि ग्रंथीं लिहिली अक्षरें ॥ जैसा वाजविणार फुकितो वारें ॥ तैसींचि वाजंत्रे वाजती ॥ १२ ॥ क्षेत्रांत बीज पेरिले जाण ॥ अंकुर येणे जीवनाधीन ॥ की जळमंडपियाचें नाचणे जाण ॥ कळसूत्राधीन असे कीं ॥ १३ ॥ तेवीं भक्तविजयग्रंथीं । बुद्धीचा दाता श्रीरुक्मिणी पती ॥ तेणें उजळोनियां माझी मती ।। ग्रंथ निजयुक्ती लिहविला ॥ १४ ॥ शके सोळाशें चवन्यायशीं ॥ चित्रभानुनाम संवत्सरासी ॥ वैशाखवद्यद्वादशीसी ॥ ग्रंथ सिद्धीमी पाव विला ॥१५ ॥ प्रवरेपासूनि दक्षिणेस ॥ ताहाराबाद गांव पांच कोस ॥ भक्तविजय अति सुरस ॥ झाला असे ते ठायीं ॥ १६ ॥ शेवटील विनवणी आतां ॥ माझी ऐकें गा पंढरीनाथा ॥ तूंचि श्रोता आणि वक्ता ॥ ग्रंथरक्षिता निज कृपें ॥ १७ ॥ तूं अखिल अविनाश जगद्गुरु ॥ मायातीत सर्वेश्वर ॥ निराधारियांसी आधारु करिसी भवपारु दासांसी ॥ १८ ॥ भक्तांनी जैसी घेतली आळ । ती तूं पुरविसी तत्काळ ॥ त्यांचे प्रेम देखोनि निर्मळ ॥ हृदयकमळी वसविले ॥ १ ९ ॥ कोणासी दिधलें आत्मज्ञान ॥ कोणी मागितले मायुज्यमदन ॥ माझें हेंचि इच्छीतसे मन ॥ जे गुण वर्णीन हरीचे ॥ २२०॥ कोणी बैसले वज्रासनीं ॥ कोणी बसले वैकुंठभुवनीं ॥ मी निजदामांचे कीर्तनीं ॥ झालों रत सप्रेम ॥ २१ ॥ अवीट आवडी धरूनि चित्तीं ॥ तुझिया दासांची वर्णिली स्तुती ।। हैचि उचित महीपती ।। मागे निजप्रीती निरंतर ॥ २२ ॥ स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ मतपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥२२३ ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति भक्तविजयग्रंथः समाप्तः ॥ ।। भक्तविजय सप्तपंचाशत्तमाध्याय समाप्त ।।

संत तुकाराम दृष्टांत

संत तुकाराम दृष्टांत

संत महीपति यांना स्वप्न पडले . स्वप्नात तुकारामबुवा आले . ते म्हणाले , “ नामदेवाची शत कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा अपुरी राहिली ती मी पूर्ण केली . संतांची चरित्रे लिहून पूर्ण करण्याचे काम तू करावेस . " महिपतीबुवा जागे झाले . तुकाराममहाराजांनी स्वप्नात येऊन शिष्य म्हणून आपला स्वीकार केला अशी बुवांची खात्री झाली .

 बुवा लिहितात : जो भक्तिनाथ बैराग्यपुतळा । ज्याचे अंगी अनंत कळा ।। तो सदगुरु तुकाराम आम्हांसी जोडला | स्वप्नी दिधला उपदेश ।। ( भक्तिलीलामृत अध्याय १-२० )

 स्वप्नात झालेली तुकारामांची आज्ञा हा ईश्वरी . दृष्टांत आहे , असे समजून महिपतीबुवांनी संतांची चरित्रे लिहिण्यास आरंभ केला . नाभाजींची हिंदी भक्तमाला , उद्धव चिद्धनांची संतमाला , भक्तकथामृतसार व दासो दिगंबर याच्या संतविजय या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला . नामदेवांचे तीर्थावळी हे प्रकरण वाचले . मग या ग्रंथकाराचा संमत एक करून भक्तविजय आरंभिला । त्यांनी एकनाथ , तुकाराम यांच्या वंशजाकडून माहिती मिळविली आणि मगच लेखन केले . महिपतीबुबांचे ग्रंथ - लेखन त्यांनी नामदेव , ज्ञानदेव , दामाजी , भानुदास , एकनाथ , तुकाराम , बोधलेबुवा गणेशनाथ इत्यादी संतांची चरित्रे आपल्या ग्रंथात लिहिली . या चरित्र - लेखनामागची महिपतीबुवांची वृत्ती भाविकाची आहे . या वृत्तीमुळे पांडुरंगच आपणाकडून चरित्र - लेखन करून घेत आहे , असे त्यांना वाटे . ते म्हणतात :

 ग्रंथ बदविता रुक्मिणीपती । मी तो मंदमती अज्ञान ।। ( ७५ : १ ) वदविता रुक्मिणीकांत । महिपती ज्याचा मुद्रांकित । पवाडे वर्णित संतांचे ( २० ९ : ३४ ) ( संतलीलामृत )

*(श्री भक्तविजय ग्रंथ प्रस्तावना)*

मंगलवार, 21 अप्रैल 2020

संत महीपति ऑक्सफ़ोर्ड प्रेस प्रकाशन

महीपतीबुवांच साहित्य वाचायचं म्हणून इंटरनेटवर शोध घेतला आणि आक्सफर्डच्या मुद्रणालयात मुद्रीत १९१९ मधील पुस्तकाची प्रत मिळाली. सी ए किनकैड यांनी महिपती बुवांच्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. प्रस्तावनेतील त्यांचा महिपती बुवांच्या बद्दलचा आदर जाणवतो व त्याच्या त्याग व योगदानाबद्दल गौरवोद्गार लेखकाने वाचकांपर्यंत पोचवले आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रातील शालेय ‌अभ्यासक्रमात या ताहाराबाद मधील संतसाहित्यिक संताचा कोठेही उल्लेख दिसत नाही. संतांचं चरित्र जीवन उजळून काढते पण त्याचा किमान महाराष्ट्रातील शिक्षणात समावेश करायला हवा होता. परदेशातील नागरिक भारतीय संत साहित्य ‌अभ्यासत आहेत ज्ञान प्राप्त करत आहेत व आम्ही मात्र त्यांचे ग्रंथ अध्ययन करण्याऐवजी यात्रा उत्सव याच्या ‌अवडंबरातच बुडालो आहोत. मंदिरात कोणालाही वाचायला ग्रंथ उपलब्ध हवेत विक्रीसाठी उपलब्ध हवेत ही योजना करायला हवी...! 
पुर्वी जस्टीन ‌अबाॅट या लेखकाचा परिचय झाला होता आता किनकैड यांचा ग्रंथ मिळाला...
धन्योहम् ताहाराबाद हे आमचं गाव...!

~दत्तात्रय नाईकवाडे, ताहराबादकर